Posts

Showing posts from March, 2018

शरयू आनंदाचा....

लहानपणापासून आपण ऐकत असतो अन्न ,वस्त्र, निवारा मानवाच्या प्रमुख गरजा आहेत.." आनंद" मिळणं महत्वाचं नाही का?        सकाळी उठल्यावर 'काय frehs वाटतंय!!असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नव्या दिवसातला तो आनंदच आपण एका प्रकारे व्यक्त करत असतो अस मला वाटतं....टूथपेस्टच्या चवीतला आनंद, थंडीच्या दिवसात गरम पाण्यात मनसोक्त डुंबून राहून अंघोळ करण्याचा आनंद,गरम गरम चहा पितानासुद्धा आपल्याला आनंद मिळत असतो..पण हल्ली धावपळीच्या जगात तो आनंद तेवढा उपभोगता येत नाही हे ही तितकंच खरं...प्रत्येक छोट्या गोष्टींमधून माणसाला आनंद मिळत असतो मग जगात इतकं दुःख का?? कारण अति तिथे माती!!! आनंद मिळवताना कुठेतरी, कधीतरी एक मर्यादा ओलांडली जाते..त्यातून स्पर्धा, ईर्ष्या,महत्वाकांक्षा वाढत जाते..ज्या गोष्टींतून आपल्याला आनंद मिळतोय ती गोष्ट मिळवायला काही विशिष्ट वेळी आपण कोणत्याही थराला जातो आणि पदरी दुःख येत..म्हणून आयुष्यात असे तरंग शोधायचे ज्यामुळे आपल्याला चैतन्य आणि उत्साह मिळेल..आणि निराशा येणार नाही..प्रत्येक वेळी काही तरी मोठं घडल्यावरचं आनंद मिळेल असं नसतं तर छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद...

माझ्यातली मी

Image
माझ्यातली मी...            मनात खूप काही आहे सांगण्यासारखा पण काही वेळा शांत बसणं बरं असतं आतल दुःख मनात ठेवून एकांतात राडावस वाटतं म्हणून आज अथांग समुद्रासमोर स्वतःला समोर ठेऊन आज मी माझ्यातल्या 'मी' ला शोधण्यासाठी आलेय.. खूप प्रयन्त केला पण 'मी' काही सापडलेच नाही...पण तरीही काही जुन्या आठवणी आठवून फार आनंद मिळाला..जुन्या आठवणी तेव्हाच आठवतात जेव्हा नविन काहीतरी मनाच्या विरुद्ध चालेल असतं हे मात्र खरं...आठवणी या मुंग्यांच्या वारुळाप्रमाणे असतात..! वारूळ पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास घेता येत नाही. पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एकामागोमाग असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणींचही तसंच आहे..!!आठवणी ह्या माणसांना पुन्हा नवीन जीवनाची ओळख करून देतात...ती लहान पनीची शाळा रोज सकाळी वरळी sea pace वरून शाळेला जायचं शाळा सुटली की त्याच ठिकाणाहून पुन्हा रमत गमत नाचत घरी येयच आईला त्रास देयचा, बाबांचा खुशीत जोपायच, आईचा हातानी जेवायचं, ते भांडीकुंडीचा खेळ, कट्टी बट्टीच भांडण,...शाळेतले मित्र मैत्रिणी हे त्या विशिष्ट काळापर्यंतच सोबत राहिले पण त्यांच...