शरयू आनंदाचा....
लहानपणापासून आपण ऐकत असतो अन्न ,वस्त्र, निवारा मानवाच्या प्रमुख गरजा आहेत.." आनंद" मिळणं महत्वाचं नाही का? सकाळी उठल्यावर 'काय frehs वाटतंय!!असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा नव्या दिवसातला तो आनंदच आपण एका प्रकारे व्यक्त करत असतो अस मला वाटतं....टूथपेस्टच्या चवीतला आनंद, थंडीच्या दिवसात गरम पाण्यात मनसोक्त डुंबून राहून अंघोळ करण्याचा आनंद,गरम गरम चहा पितानासुद्धा आपल्याला आनंद मिळत असतो..पण हल्ली धावपळीच्या जगात तो आनंद तेवढा उपभोगता येत नाही हे ही तितकंच खरं...प्रत्येक छोट्या गोष्टींमधून माणसाला आनंद मिळत असतो मग जगात इतकं दुःख का?? कारण अति तिथे माती!!! आनंद मिळवताना कुठेतरी, कधीतरी एक मर्यादा ओलांडली जाते..त्यातून स्पर्धा, ईर्ष्या,महत्वाकांक्षा वाढत जाते..ज्या गोष्टींतून आपल्याला आनंद मिळतोय ती गोष्ट मिळवायला काही विशिष्ट वेळी आपण कोणत्याही थराला जातो आणि पदरी दुःख येत..म्हणून आयुष्यात असे तरंग शोधायचे ज्यामुळे आपल्याला चैतन्य आणि उत्साह मिळेल..आणि निराशा येणार नाही..प्रत्येक वेळी काही तरी मोठं घडल्यावरचं आनंद मिळेल असं नसतं तर छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद...